पिंपरखेड जिल्हा परिषद शाळेत अक्षरांचा उत्सव!*

*पिंपरखेड जिल्हा परिषद शाळेत अक्षरांचा उत्सव!*

*कवी हरिश हातवटे यांच्या कवितांनी विद्यार्थी मंत्रमुग्ध*

जामखेड (प्रतिनिधी):

*”पुस्तके केवळ छापील कागद नसून ते विचारांचे जिवंत झरे आहेत. जो विद्यार्थी अवांतर वाचन करतो, तोच भविष्यात प्रगल्भ विचारांचा नागरिक बनतो,”* असे प्रतिपादन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक आणि प्रसिद्ध कवी मा. श्री. हरिश हातवटे यांनी केले.
मराठी राजभाषा गौरव दिन व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड (ता. जामखेड) येथे ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ अंतर्गत ‘उत्कृष्ट वाचक विद्यार्थी सन्मान’ सोहळा* अत्यंत दिमाखात पार पडला. यावेळी *हातवटे सरांनी आपल्या खास शैलीत कविता सादर करून विद्यार्थ्यांना वाचनाच्या आणि स्वप्नांच्या दुनियेची सफर घडवून आणली*.

 

*वैशाली ज्वेलर्सचे प्रायोजकत्व आणि गौरव*

या विशेष सोहळ्याचे प्रायोजकत्व ‘वैशाली ज्वेलर्स’ जामखेड यांनी स्वीकारले होते. त्यांच्या वतीने *सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी (गौरवचिन्ह) देऊन सन्मानित करण्यात आले*. वैशाली ज्वेलर्सचे संचालक मा. *श्री. अमोल चिंतामणी यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला*. यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक बांधिलकीतून शिक्षणाला मदत करण्याचा आनंद व्यक्त केला.

*प्रवीण शिंदे सरांनी मांडले शैक्षणिक मूल्य*

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रवीण शिंदे यांनी करून दिला. यावेळी त्यांनी *जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब यांच्या प्रेरणेतून व कल्पनेतून होत असलेल्या *’कुसुमाग्रज वाचन अभियानाचे’ शैक्षणिक मूल्य विशद* केले. विद्यार्थ्यांचा भाषिक विकास, शब्दसंग्रह आणि विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी अवांतर वाचन कसे अनिवार्य आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

मान्यवरांची उपस्थिती
*कार्यक्रमाचे अध्यक्षपद केंद्रप्रमुख मा. श्री. विक्रम बडे यांनी भूषवले. यावेळी त्यांनी जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी ठरलेल्या संघांना रोख रक्कम स्वरूपात पुरस्कार दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक लबडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष चंद्रकांत आधुरे आणि प्रतिष्ठित नागरिक दत्ता आधुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.* मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट वाचक ठरलेल्या विद्यार्थ्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात गौरव करण्यात आला.

*संयोजन आणि आभार*

कार्यक्रमाचे अतिशय नेटके आणि ओघवते *सूत्रसंचालन सुभाष सरोदे* यांनी केले, तर उपस्थितांचे *आभार श्रीमती सुशीला जरे* यांनी मानले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खालील शिक्षकांनी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले:
* केशव हराळे
* अंगद कोथमिरे
* रवींद्र मधुरकर
* भानुदास फुलमाळी
* छाया जाधव
*यांनी विशेष परिश्रम घेतले*.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page