Posts Slider
Health
जामखेड – करमाळा मार्गावरील बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करव्यात.
जामखेड – करमाळा मार्गावरील बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करव्यात.
— सभापती प्रा राम शिंदे
जामखेड –
जामखेड – करमाळा मार्गावर बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करण्याबरोबरच नियमीत वेळेवर बस सोडण्याच्या सुचना महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा राम शिंदे यांनी जामखेड आगारप्रमुखांना केल्या आहेत.
जामखेड – करमाळा मार्गावरील अचानक बंद करण्यात आलेल्या बस पुर्ववत सूरू कराव्यात आणि नियमीत वेळेवर बस सोडण्याची मागणी सभापती राम शिंदे यांच्याकडे जवळा येथील भाजपा नेते प्रशांत पाटील , राहूल पाटील, उमेश रोडे, राष्टपाल आव्हाड, संतोष सुरवसे, महादेव वाळुंजकर, एकनाथ हजारे,महेंद्र खेत्रे, सुभाष धोत्रे यांनी निवेदनाव्दारे केली होती. याची दखल घेत सभापती शिंदे यांनी जामखेड आगारप्रमुख प्रमोद जगताप यांना दुरध्वनीवर संपर्क करून तशा सुचना दिल्या.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेडच्या आगारप्रमुखांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असून, याबाबत विचारणा केल्यास उध्दटपणाची वागणूक प्रवाशांना मिळत आहे. जवळा मार्गावरील अनेक वर्षापासून चालु असलेल्या गाड्या आगारप्रमुखांनी अचानक बंद केल्याने प्रवाशांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कोणतीही गाडी वेळेवर सूटत नसल्याने विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नूकसान होत आहे.
जामखेड आगाराची ५० वर्षांपासून नियमीत चालु असलेली जामखेड – जवळा मुक्कामी बस पुर्ववत सूरू करणे गरजेचे आहे. सदरची बस अचानक बंद करण्यात आल्याने रात्री जवळा , नान्नज, बोर्ले,राजेवाडी,धोंडपारगाव, झिक्री, पाडळी, सरदवाडी, चुंबळी या गावांमधील प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाणे शक्य होत नाही. जामखेडहून रात्री साडेआठ वाजता निघणा-या या बसमुळे नगर,पुणे,बीड तसेच बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांना उशीरात उशीरा गावाकडे जाणे शक्य होत होते. मात्र सदरची गाडी जामखेड आगारप्रमुखांनी काहीही कारण नसताना अचानक बंद केली आहे. गाडी बंद असल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत.
जामखेड आगाराची गेली ४० वर्षापासून चालु असलेली जवळा – नगर (जवळा मुक्कामी ) बस जामखेड आगारप्रमुखांनी अचानक बंद केल्याने जवळा, हाळगाव, पिंपरखेड व अरणगाव परिसरातील प्रवाशांना अहिल्यानगरला जाण्यायेण्यासाठी खूपच गैरसोय झाली आहे. नगर जवळा मुक्कामी बस पुर्ववत सूरू करणे गरजेचे आहे.
जामखेड-करमाळा रस्त्यावर अनियमीत वेळेत बस चालत असल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. या मार्गावर २-२ तास बस फेरी होत नसल्याने,प्रवाशी तसेच विशेषकरून विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. काॅलेज सूटल्यानंतर गावी येण्यासाठी वेळेवर बस नसल्याने या विद्यार्थ्यांना जामखेड बसस्थानकावरच २-२ तास बसची वाट पाहत बसावे लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय होतानाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे. याप्रश्री करमाळा रस्त्यावर नियमीत व वेळेवर बस सुटण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
अकलुज (जिल्हा सोलापुर) आगाराची अकलूज – संभाजीनगर ही एकमेव बस जवळा गावात न येता जवळा गावाबाहेरून जात असल्याने, अकलूज तसेच संभाजीनगरकडे जाणा-या प्रवाशांना ही बस असून अडचण,नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. या बसला जवळा थांबा असल्याने या बसमध्ये प्रवाशी घेतले जातात. मात्र प्रवाशांना जवळा बसस्थानकावर न सोडता जामखेड करमाळा मार्गावरच उतरवले जाते. यात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याप्रश्री मागणी केल्यानंतर तात्पुरती काही दिवस बस जवळा बसस्थानकावर येते.मात्र या बसचे चालक वाहक मनमानीपध्दतीने पुन्हा बस बाहेरूनच घेवून जातात. याबाबत अकलूज आगाराने सबंधीत चालक वाहकांना सुचना देण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे निवेदन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक, जामखेडचे आगारप्रमुख व अकलुजचे आगारप्रमुख यांना देण्यात आले आहे.
फोटो –
जामखेड – एसटी बाबत आगारप्रमुख प्रमोद जगताप यांना निवेदन देताना भाजपा नेते प्रशांत पाटील , राहूल पाटील, उमेश रोडे, संतोष सुरवसे, महादेव वाळुंजकर, राष्टपाल आव्हाड, एकनाथ हजारे,महेंद्र खेत्रे, सुभाष धोत्रे
Economy
food processing unit अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी
food processing unit सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.
वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)
शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.
बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.
काय आहे योजनेचा उद्देश?
अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.
कोठे संपर्क करावा
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.
कोणते अन्नप्रक्रिया उद्योग
दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,
लस्सी.
■ मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.
■ पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,
आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट
प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.
■ तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व
प्रकारची तेल उत्पादने.
■ पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,
ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.
■ पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य
इत्यादी.
■ कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे
इत्यादी.
■ राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.
■ बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.
Posts Carousel
Latest News
जामखेड – करमाळा मार्गावरील बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करव्यात.
जामखेड – करमाळा मार्गावरील बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करव्यात. — सभापती प्रा राम शिंदे जामखेड – जामखेड – करमाळा मार्गावर बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करण्याबरोबरच नियमीत वेळेवर बस…
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जामखेड शहर व तालुक्यात माजी उपसभापती अंकुश ढवळे यांचे एकमेव झळकवले बॅनर…
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे जामखेड शहर व तालुक्यात माजी उपसभापती अंकुश ढवळे यांचे एकमेव झळकवले बॅनर… उपसभापती अंकुश ढवळे यांनी जामखेड शहर व तालुक्यात बॅनर झळकावून निष्ठावंत दाखवून दिले…
जिल्हाधिकारी यांनी 100 डेज कॅम्पिंग चे केले कौतुक..
जिल्हाधिकारी यांनी 100 डेज कॅम्पिंग चे केले कौतुक.. अरोग्य कर्मचारी यांच्याशी संवाद साधत काम समाधानकारक असल्याचे केले नमुद.. जामखेड प्रतिनिधी. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरणगाव खर्डा, नान्नज हाळगाव व…
रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी..
रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी.. जामखेड प्रतिनिधी जामखेड शहरातील नगरपरिषद, बसस्थानकासह रखडलेल्या कामांची जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ यांनी पहाणी करत शासकीय दवाखान्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची केली सुचना…
स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी लढणार्या आ. सुरेश धस व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जामखेड येथे दुग्धाभिषेक
स्व.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी लढणार्या आ. सुरेश धस व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा जामखेड येथे दुग्धाभिषेक जामखेड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज…