एस एस मोबाईल शॉप चे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न….

एस एस मोबाईल शॉप चे उदघाटन मोठ्या उत्साहात संपन्न….

जामखेड प्रतिनिधी,

जामखेड शहरात बीड रोड कॉर्नर पोलीस स्टेशन रोडवार एस एस मोबाईल शॉप चे उदघाटन तालुलक्यातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न

भारतात, महाराष्ट्र गोवा सह 196 ते 200 शाखा असणारे एस एस मोबाईल शॉप आता जामखेड शहरात सुरु झाले आहे, एस एस मोबाइल स्टोर भारतातील पाचव्या क्रमांकाची मोबाईल रिटेल कंपनी असून जामखेड येथे या मोबाईल शॉपीचे उदघाटन संपन्न झालं आहे

यावेळी, प्रा मधुकर आबा राळेभात,प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी,तालुका अध्यक्ष दत्तात्रय वारे,प्रसिद्ध उद्योगपती दिलीप शेठ गुगळे,सभापती शरद कार्ले, माजी सभापती भगवान मुरूमकर, शिवसेना ता प्रमुख कैलास माने,रमेश दादा आजबे बापूराव ढवळे, मंगेश दादा आजबे, संतोष फिरोदिया,संध्याताई सोनवणे,नगरसेवक महेश निमोणकर, नगरसेवक ज्ञानेश्वर झेंडे,संजय पारे वकील, विकी घायतडक, विकीभाऊ सदाफुले, संतोष गव्हाळे, राजेश मोरे,स्वीय सहायक आल्ताफ शेख,लहू शिंदे,हवा सरनोबात,विकास पवळ,शिवकुमार डोंगरे, दीपक टेकाळे, अण्णासाहेब ढवळे,जयशिग डोंगरे, बापूराव शिंदे,जाकीर शेख सर, प्रवीण बोलबट,प्रा अहिरे सर, लक्ष्मण ढेपे, दीपक महाराज व नागरिक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते

प्रत्येक मोबाईल ची किमंत कंपनी च्या बिलिंग प्रमाणे होत आहे अनेक स्कीम मोबाइल वार आहेत वॉरंटी दोन वर्ष आपण देत आहोत तरी जामखेड करानी याचा लाभ घ्यावा आहे आवाहन मोबाईल कंपनी चे हेड यांनी केले आहे….

यावेळी वारे बोलताना म्हणाले कि राजकारण आणि व्यवसाय दोन्हीही जमलं पाहिजे मामांचा मुलगा उत्तम पद्धतीने व्यवसाय करत आहे यामुळे नक्कीच आता जामखेड बदलताना दिसत आहे

यावेळी मधूआबा शुभेच्छा देताना म्हणाले कि या कंपनीच्या भारतात 200 शाखा आहेत आपल्या जामखेडला शाखा मिळाली हे आपलं भाग्य आहे आणि जामखेड कराना यामुळे कंपनीच्या दरात स्वस्त मोबाईल बीबीषण धनवडे यांच्या माध्यमातून मिळतील मामामुळे अजून या कंपनीच्या शाखा वाढतील

यावेळी मा सभापती डॉ मुरूमकर म्हणाले कि, व्यवसाय राजकारण या दोन्हीही बाजूत खूप फरक आहे राजकारणात माणूस पडला कि व्यवसायाचा खुटा उपटतो परंतु मामानी या व्यवसायाची जबाबदारी आपल्या मुलावर दिलेली आहे त्यामुळे व्यवसाय आणि राजकारण हे जपता येईल

यावेळी बोलताना सभापती शरद कार्ले म्हणाले कि, या मोबाईल शॉपी मुळे जामखेड कराना सर्व कंपन्याचे मोबाइल फोन स्वस्तात मिळणार आहेत मी देखील आज मोबाईल घेतला त्यामुळे जामखेड कराचा आता फायदा होईल

यावेळी बोलताना राजेंद्र कोठारी म्हणाले कि, या एस एस मोबाईल शॉप मुळे जामखेड च्या वैभवत आणखी एक भर पडली आहे या मोबाईल शॉपी मुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला फायदा होईल कारण hi बाजार पेठ तीन जिल्ह्याच्य हद्दीवर आहे

या मोबाईल शॉपीमध्ये सॅमसंग, अँपल, विवो, अप्पो, वन प्लस व अनेक कंपन्याचे मोबाईल कंपनी to ग्राहक या रेट मध्ये मिळतील याचा जामखेड करानी फायदा घ्यावा असे आवाहन बीबीषण मामा धनवडे यांनी केले आहे

यावेळी कार्यक्रमचे सूत्रसंचालन हनुमंत निकम यांनी केले तर आभार नगरसेवक बीबीषण मामा धनवडे यांनी मानले

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles