उद्यापासून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार व निलाव सुरु 

उद्यापासून जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार व निलाव सुरु

 

जामखेड प्रतिनिधी

 

 

व्यापारी आणि बाजार समितीच्या सभापती यांच्यातील मतभेद किंवा वाद मिटले आहेत आणि आता बाजारपेठेतील कामकाज पूर्ववत सुरू झाले आहे. सध्या महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये विविध मागण्यांसाठी बंद होते, गाळे बांधकाम, शेतकरी भवन व गळ्यापुढील रस्ता यामुळे व्यापाऱ्यांनी निलाव बंद ठेवले होते परंतु सभापती शरद दादा कार्ले यांनी चर्चा करून व आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला असून व्यवहार सुरू झाले आहेत,

 

व्यापारी संघटना आणि बाजार समिती यांच्यात काही मागण्यांवरून संघर्ष होता, जो आता संपला आहे. बंद पुकारल्यानंतर, आता व्यापारी पुन्हा मालाची खरेदी-विक्री करत आहेत.त्यामुळे हा प्रश्न मिटल्यानंतर, आता कामकाज सुरळीत सुरू झाले आहे.

थोडक्यात, व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होऊन तोडगा निघाला आहे आणि कृषी उत्पन्न बाजारसमितीतील कामकाज पुन्हा सुरू झाले आहे.

 

यावेळी सभापती उपसभापती, संचालक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page