Featured News
Posts Slider
Health
जामखेड बाजार समितीत ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ला सुरुवात
*स्वच्छ बाजार समित्यांमुळे व्यवहारात वाढ – प्रा. मधुकर राळेभात यांचे प्रतिपादन*
जामखेड बाजार समितीत ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ला सुरुवात
प्रतिनिधी | जामखेड
बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होतो. स्वच्छतेमुळे आरोग्य सुधारतेच, पण वातावरण प्रसन्न झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये जास्त दर देण्याची मानसिकता निर्माण होते, असे मत जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
आज रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती व जामखेड नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ राबवण्यात आले.यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की,राज्यात सुरू असलेल्या १०० दिवसीय स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. “स्वच्छता म्हणजेच देवता. स्वच्छ परिसरात देवाचा वास असतो,” असे सांगत त्यांनी बाजार समित्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
यावेळी जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे,भारतीय जनता पार्टीचे नेते प्रा.मधुकर राळेभात,बाजार समितीचे सभापती पै.शरद कार्ले,संचालक गौतम उतेकर, विष्णू भोंडवे, डॉ गणेश जगताप,सतिश शिंदे,डॉ सिताराम ससाणे,राहुलशेठ बेदमुथ्था, सुरेश पवार, रविंद्र हुलगुंडे तसेच संजय काशिद , बाजार समितीचे सचिव, बाजार समिती अधिकारी /कर्मचारी ,नगर परिषद कर्मचारी ,व्यापारी, हमाल कामगार वर्ग या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी अजय साळवे म्हणाले की,नागरिकांच्या जीवनमानाने शहर स्वच्छ ठेवण्यासाठी जामखेड नगर परिषद कायम तत्पर आहे.हा कार्यक्रम प्रतिनिधीक स्वरूपात नसून संपूर्ण शहरात राबविण्यात येणार आहे . स्वच्छ जामखेड, सुंदर जामखेड तयार करण्याचा मानस आपण ठेवत आहोत.
बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले यांनी माहिती देताना सांगितले, “मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन बाजार परिसर अधिक स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. सर्व नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
*चौकट*
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि मुख्यमंत्री महोदयांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाअंतर्गत बाजार समितीच्या आवारात स्वच्छतेवर भर देण्यात येणार असून, नियमित साफसफाई, निर्जंतुकीकरण, कचरा व्यवस्थापन आणि जनजागृतीसारख्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. बाजारात येणाऱ्या शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांना स्वच्छ, आरोग्यदायी वातावरण निर्माण करून देण्याचा मुख्य उद्देश आहे.
Economy
food processing unit अन्न प्रक्रिया उद्योजक होण्याची सुवर्णसंधी
food processing unit सध्या कार्यरत असलेल्या सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाचा विस्तार वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासोबतच नविन अन्न प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत उद्योग उभारण्यासाठी वैयक्तिक व गटासाठी १० लक्ष रुपये अनुदान तर कोणत्याही गट किंवा कंपनीला सामाईक पायभुत सुविधांच्या (CSC) उभारणीसाठी प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तित जास्त ३ कोटी पर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १७५ लाभर्थ्यांना ५ कोटी रुपये कर्ज मंजुर करण्यात आले असुन काही उद्योगही उत्तम प्रकारे सुरु झाले आहेत.
वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग
वैयक्तिक मालकी भागीदारी, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, अशासकीय संस्था, सहकारी संस्था, खासगी कंपनी, यांना एकूण प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त १० लाखांपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
सुक्ष्म अन्न प्रक्रिया गट उद्योगाना लाभ (सामाईक पायाभुत सुविधा)
शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था, स्वयंसहायता गट आणि त्यांचे फेडरेशन, शासकीय संस्थांना प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के आणि जास्तीत जास्त तीन कोटींपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
मार्केटींग व ब्रॅंडिंग यासाठी पात्र प्रकल्प खर्चाच्या ५० टक्के, कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहित करण्यात आलेली आहे.
बीज भांडवलग्रामीण व शहरी भागातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगातील स्वयंसहायता गटातील सदस्य, गट, त्यांचे फेडरेशन यांना लहान मशिनरी खरेदी करण्यासाठी व खेड ते भांडवल म्हणून प्रत्येक सदस्य कमाल चाळीस हजार रुपये व स्वयंसहाय्यता गटाला कमाल चार लाख रुपये देण्यात येते.
काय आहे योजनेचा उद्देश?
अन्न प्रक्रिया उद्योगाच्या पतमर्यादा वाढवून उत्पादनांचे ब्रॅंडिंग व विपणन अधिक बळकट करून संघटित साखळीशी जोडणे, सामाईक प्रक्रियासुविधा, प्रयोगशाळा, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्मउद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे हेप्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा उद्देश आहे.
कोठे संपर्क करावा
केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ घेण्यासाठीइच्छुकांनी केंद्र शासनाच्या https://pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयांशी संपर्क साधता येईल.
कोणते अन्नप्रक्रिया उद्योग
दूध प्रक्रिया : खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप,
लस्सी.
■ मसाले प्रक्रिया : चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला,मटण-चिकन मसाला, गोडा मसाला, शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारल्याची चटणी, जवसाची चटणी.
■ पालेभाज्या व फळे प्रक्रिया : आंबा, सिताफळ, पेरु, सफरचंद, आवळा,मोसंबी, लिंबू, चिंच, बोर, जांभूळ इत्यादीपासून प्रक्रिया उद्योग, जाम, जेली,
आईस्क्रीम, रबडी, काजू, बदाम, पिस्ता, बेदाणा, ड्रायफ्रूट इत्यादी रेडी टू इट
प्रक्रिया अंतर्गत येणारे सर्व खाद्यपदार्थ पॅकिंग ब्रॅंडिंगसह सर्व प्रकारची फळे तसेच सर्व प्रकारच्या पालेभाज्या प्रक्रिया उद्योग यात येतात.
■ तेलघाणा प्रक्रिया : शेंगदाणा, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ, बदाम व सर्व
प्रकारची तेल उत्पादने.
■ पावडर उत्पादन प्रक्रिया: काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स,
ज्वारी, गहू, मिरची, धना, जिरे, गूळ, हळद.
■ पशुखाद्य निर्मिती : मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य
इत्यादी.
■ कडधान्य प्रक्रिया : हरभरा व इतर डाळी (पॉलिश करणे), बेसन तयार करणे
इत्यादी.
■ राईस मिल : चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इत्यादी.
■ बेकरी उत्पादन प्रक्रिया: बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट,नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चुरमुरे.
Posts Carousel
Latest News
जामखेड बाजार समितीत ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ला सुरुवात
*स्वच्छ बाजार समित्यांमुळे व्यवहारात वाढ – प्रा. मधुकर राळेभात यांचे प्रतिपादन* जामखेड बाजार समितीत ‘स्वच्छ बाजार आवार अभियान’ला सुरुवात प्रतिनिधी | जामखेड बाजार समित्या स्वच्छ असतील तर त्याचा थेट लाभ…
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल
*सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी आज दिवसभरात दोन अपघातातील दोघांना केले दवाखान्यात दाखल* जामखेड प्रतिनिधी, हॉटेल सेलिब्रेशन नगर रोड समोर एका महिन्यात आठ जण जखमी हॉटेल सेलिब्रेशन समोर रोडचे काम…
अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत
अहिल्यानगरची लेक शमीम अली दिसणार पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या भूमिकेत जामखेड प्रतिनिधी – जामखेड – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘देवी अहिल्याबाई’ या हिंदी नाटकात अहिल्याबाईंची मध्यवर्ती भूमिका मूळची नगरची असलेली…
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना
आता प्रत्येक गावातील तलावांचे होणार पुनरुज्जीवन तलावातला गाळ काढण्यासाठी शासनाची खास योजना (अहिल्यानगर जामखेड): महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या वर्षी जोरदार तयारी केली आहे. राज्यातील प्रत्येक गावांच्या तलावातील…
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार
पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेल्या वैभव वराटचा कोठारी प्रतिष्ठानतर्फे सत्कार जामखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत साकत (ता. जामखेड) येथील वैभव बळीराम वराट याची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी…